breaking-newsमहाराष्ट्र

भाजप, शिवसेना युतीचा आज ‘काडीमोड’ होणार ?

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप संघर्ष विकोपाला जाण्याची  शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली तर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील हा मोठा भूकंप असणार आहे. गेल्या चार वर्षातील शिवसेना- भाजपचे संबंध पाहता, उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button