भाईजाननं दत्तक घेतले पुरग्रस्त कोल्हापूरातील ‘हे’ गाव
कोल्हापूर | महाईन्यूज|
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खाननं ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या कोल्हापुरातील पुराचा फटका बसलेल्या गावाला दत्तक घेतलं आहे…सलमान खाननं कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव दत्तक घेतलं तसेच या गावातील पूरग्रस्तांना तो पक्की घरेही बांधून देणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील बरीच गावे या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तत्कालीन राज्य सरकारपासून अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता ‘भाईजान’ने उशिरा का होईना पण पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडकी घरे पुन्हा बांधून देण्यासाठी धाव घेतली आहे.
खिद्रापूर गाव सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून दत्तक घेतल्याची माहिती आहे. सलमान पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी पक्की घरे बांधून देणार आहे. मात्र याबाबत सलमान खानकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.