breaking-newsराष्ट्रिय

‘भय्यूजींवर सरकारचा दबाव होता’- करणी सेना

इंदूर:  स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असतानाच भय्यू महाराजांवर सरकारचा दबाव होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केला आहे. ‘भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्ताऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव वाढवला होता, परिणामी भय्यूजींनी आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी करणी सेनेने केली आहे. करणी सेनेच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी हा दावा केला. भय्यूजींकडे नर्मदा घोटाळ्याचे कागदपत्रे होती. त्यांनी ही कागदपत्रे उघड करू नये म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला होता. तशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांकडून मिळत असल्याचं गोगामेडी यांनी सांगितलं. मात्र गोगामेडी यांनी यावेळी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.

‘सरकार खरोखरच प्रामाणिक असेल तर त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. त्यामुळे सत्यबाहेर पडेल. सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करेन,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भय्यू महाराज यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबियांचा, शिष्यांचा किंवा सरकारशी संबंधित व्यक्तिचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त करतानाच भय्यूजींच्या अंतिमसंस्काराला कुठलाही मोठा नेता किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button