breaking-newsराष्ट्रिय

भक्तांची संख्या घटल्याने भय्यूजींची आत्महत्या?

भोपाळ:  स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कौटुंबिक कलहापाठोपाठ त्यांचं दुसरं लग्न हे सुद्धा त्यांच्या आत्महत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दुसरं लग्न झाल्यामुळे भय्यू महाराज यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. त्यांच्या भक्तांची संख्याही घटली होती. शिवाय राजकारण्यांचा राबताही कमी झाला होता. त्यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

भय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतर इंदूर पोलिसांनी तीन दिवस केलेल्या चौकशीतून अनेक तथ्य समोर आले आहेत. भय्यू महाराज यांच्या कुटुंबियांच्या आणि भक्तांच्या चौकशीतून त्यांनी तणावातूनच आत्महत्या केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. मात्र भय्यू महाराज यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. पोलिसांनी भय्यू महाराज यांच्या फोन, लॅपटॉपची तपासणी सुरू केली आहे. त्यांची सुसाईड नोटही चौकशीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहे. सुसाईड नोटचा आणि भय्यू महाराजांच्या संपत्तीचा काहीच संबंध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कौटुंबिक कलह आणि समाजातील मानसन्मान कमी झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, भय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतरही त्यांची पत्नी आणि मुलीमध्ये वाद कायम आहेत. दरम्यान १५ दिवसानंतर एक बैठक घेऊन ट्रस्टच्या संपत्तीचा उत्तराधिकारी ठरवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button