breaking-newsताज्या घडामोडी

ब्राह्मणांना दुखावण्याचा हेतू नव्हता: नितीन राऊत

नागपूर | ‘सीएए व एनआरसीबद्दल बोलताना मी केलेले वक्तव्य मनुवाद व चातुर्वर्ण्याच्या विरोधात होते. माझा रोख मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता,’ असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलं आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीनं राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी सीएए, एनआरसी व एनपीआरला विरोध दर्शवताना राऊत यांनी ब्राह्मणांवर कडवट शब्दांत टीका केली होती. बामन स्वत: परदेशातून आले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. आमच्याकडं प्रमाणपत्र मागताहेत.

हे कदापि खपवून घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ माजला. भाजप नेत्यांनी राऊत यांच्यावर चौफेर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच, त्यांच्याविरोधात नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली. राऊत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण सेनेनं केली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. ‘काँग्रेस पक्ष ब्राह्मण नव्हे तर चातुर्वर्ण्य आणि मनुवाद मानणाऱ्या ब्राह्मण्यवादी विचारांचा विरोध करतो. काँग्रेस पक्षातर्फे अनेक नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यात अनेक ब्राह्मण होते आणि आहेत. पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राह्मण नेते अग्रेसर होते आणि आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button