breaking-newsमहाराष्ट्र
बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन भाजपने शंका दूर करावी : उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होत आहे, तर निवडणुकांमध्ये विजय होत आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. जे जिंकले आहेत, त्यांचे अभिनंदन करतो, असे म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री कुणीही झाला, तरी त्याने मराठी माणसाचा आदर करावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कर्नाटकच्या 224 सदस्य असलेल्या विधानसभेच्या 222 जागांसाठी 12 मे रोजी 72.13 टक्के मतदान झाले.