breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
बीडमध्ये जलयुक्त शिवार योजना घोटाळाप्रकरणी तक्रार दाखल
बीड |
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झालेला आहे. मात्र, या प्रकरणात आता तक्रार दाखल झालेली आहे. बीड जिल्ह्यातील या योजनेत तब्बल 35 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार आहे. आतापर्यंत 138 ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी एन मिसाळ आणि तालुका कृषी अधिकारी बी बी बांगर निलंबित झालेले आहेत.
आवश्य वाचा- भारताने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा- खासदार संजय राऊत