breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? – राहुल गांधी

नवी दिल्ली | महाईन्यूज

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झालेलं आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या हौतात्म्याला देशभरातून वंदन केलं जात आहे. तर यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलेलं आहे. राहुल यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत.

राहुल गांधीनी ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. ‘पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या त्रुटींमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधल्या कोणाला जबाबदार धरण्यात आलं?,’ असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केलेले आहेत. राहुल गांधींच्या या ट्विटवरुन भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी त्यांना लक्ष्य केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button