breaking-newsक्रिडा

पुरस्कारासाठी खेळाडूंना थेट अर्ज करता येणार

कोरोनाच्या काळात खेळाडूंना आपला अर्ज स्वत:हून घेऊन जाता येणे शक्य नसल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या वर्षी खेळाडूंना पुरस्कारासाठी थेट अर्ज करण्याची मुभा देण्यात आली. मात्र हाच नियम पुढेही लागू करण्यात येणार असल्याचेही संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात असे झाल्यास राजीव गांधी व खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंना थेट अर्ज करता येणार आहेत.

अशी व्हायची प्रकिया

याआधी खेळाडूंना आपला अर्ज विविध सर्टीफिकेटसह स्पोर्टस् प्रमोशन बोर्ड, राज्य सरकार, राष्ट्रीय संघटनांमार्पâत केंद्रीय क्रीडा मंत्रालयापर्यंत पोहचवा लागत असे. तसेच एका माजी पुरस्कार विजेता किंवा प्रसिद्ध क्रीडापटू याच्या दाखल्याची यासाठी गरज भासत असे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार आता खेळाडूंना थेट केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे अर्ज करता येणार आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या समितीवरही अवलंबून

खेळाडूंना थेट पुरस्कारासाठी अर्ज करता येणार असला तरी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून निवडण्यात आलेल्या समितीकडूनही त्या अर्जावर शिक्कामोर्तब होणे आवश्यक असणार आहे. कारण या नव्या नियमामुळे प्रत्येक खेळांतील असंख्य खेळाडू अर्ज करू शकणार आहेत. प्रत्येकाला पुरस्कार देणे शक्य होणार नाही. त्यामुळे खेळाडूंची कामगिरीच पुन्हा पुरस्कारासाठी महत्त्वाची ठरेल यात वाद नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button