पालघर आणि नाशिकमध्ये आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के
महाराष्ट्र सध्या एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे मात्र भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीने महाराष्ट्राच्या काही भागात नागरिक धास्तावले आहे. नाशिक जिल्ह्याला सलग दोन दिवस तर पालघरला 48 तासांच्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये सलग 5-6 भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे. दरम्यान पालघर मध्ये आज सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी सुमारे 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. तर नाशिकमध्येही त्याच वेळेस पश्चिम दिशेच्या बाजूने 93 किमी दूर सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
पालघर, तलासरी, डहाणू हे भूकंप प्रवण आहे. मुंबई शहरापासून अवघ्या 100 किमीवर असणार्या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. मागील 1-2 दिवसांत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जीवीतहानी झाल्याचं वृत्त नसले तरीही घराला तडे गेल्याच्या घटना समोर आले आहे.
नाशिक मध्येही काल सलग दोनदा आणि आज सकाळी पुन्हा 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दरम्यान वारंवार भूकंप जाणवत असल्याने नागरिकांमध्ये मात्र चागंलीच घबराहट निर्माण झाली आहे.