breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पालकमंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा ; पुण्यात अॅट्रासिटी जनजागरण परिषदेचे धरणे आंदोलन

भाजप सरकारची पक्षपाती भूमिका

पिंपरी – भिमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्यातील जातीय दंगलीकडे भाजप-शिवसेना सरकार पुर्णतः पक्षपातीपणा करत आहे. त्या हल्ल्यातील पीडित कुटूंबियांना न्याय देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या घटनेचा आंदोलकांनी निषेध व्यक्त करुन पालकमंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पालकमंत्र्याच्या जनसंपर्क कार्यालयासमोर अॅट्रासिटी जनजागरण परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भिमा-कोरेगाव दंगलीतील पीडित मंगल कांबळे, रेखा गायकवाड, पुजा खंजिरे, सीमा कांबळे आदींनी लोक सहभागी झाले आहेत. तसेच रिपब्लिकन युवा मोर्चोचे  संस्थापक अध्यक्ष राहूल डंबाळे, प्रदेश सदस्य अजय लोंढे, पुणे शहर अध्यक्ष आश्विन दोडके, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमोल उबाळे, राकेश लोढे, संगिता शहा, पुजा सकट, गौरव जाधव, धम्मपाल साळवे, जयदीप सकट आदींना कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी भिमा कोरेगाव दंगलीत पीडित कुटुंबियाची भेट घेतलेली नाही. तसेच या घटनेचा निषेध देखील नोंदविलेला नाही. त्या कुटुंबियाचे पुर्नवसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या पदावर राहण्यास आपलेल्या नैतिक अधिकार नाही म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, तसेच पीडित दलित कुटुंबियाची तत्काळ माफी मागावी, याकरिता अॅट्रासिटी जनजागरण परिषदेने आंदोलन केले आहे.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री गिरीष बापट यांनी दुरध्वनीद्वारे आंदोलकांशी संपर्क साधून 10 जून रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच 15 जून पुर्वी पीडित कुटुंबियाचे पुर्नवसन प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल, असे आश्वासन जनजागरण परिषदेच्या आंदोलकांना दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button