breaking-newsमहाराष्ट्र
पारंपरिक शेती पद्धतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक
मुंबई : ग्रामीण भागातील पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषी पद्धती जपून कृषी पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.