breaking-newsपिंपरी / चिंचवड

पवना जलपर्णीमुक्त अभियानांतंर्गत 2 ट्रक जलपर्णी काढली

पिंपरी –  रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित  जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानांतर्गत   रविवारी   (दि. 6 ) 2 ट्रक जलपर्णी काढण्यात आली. अभियानाचे 183 दिवस  पूर्ण झाले असून आतापर्यंत 1275 ट्रक जलपर्णी  नदीतून काढण्यात आली आहे.
थेरगाव येथील सकाळी  केजुबाई बंधारा  बोट कल्ब येथे हे अभियान पार पडले. या वेळी  घाटावर रो.संदिप वाल्हेकर यांच्या एस पी वायर्स  या कंपनीच्या २० सहका-यांसह  श्रमदानात सहभाग घेतला.  तसेच रोटरी क्लब आँफ मालेगावचे रो डाँ. दिलिप भावसार हे अभियान समजावून घेऊन मालेगाव येथे चालू करण्यासाठी आले होते.  रोटरी क्लब आँफ वाल्हेकरवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच रानजाई प्रकल्पाचे ५०मजूर  ,पिंपरी चिंचवड परिसरातील  अनेक रोटरी क्लब चे सदस्य, क्वीन्स टाऊन जेष्ठ नागरिक संघ ,ईसीए, पीसीसीएफ,  एसकेएफ, कामगार संघटना, पोलिस  मित्र  मंडळ, देश का सच्चा  हिरो चंद्रकांत   राधाबाई  दामोदर कुलकर्णी , माजी  नगरसेवक राजेंद्र साळुंखे  आदी उपस्थित होते.
गेल्या १८३ दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना रोटरीचे अध्यक्ष  रो प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी विस्तृतपणे सर्व नवीन सहभागी सदस्यांना सांगितली . भविष्यात केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची, योजनांची माहिती दिली  पुढील रविवारी (दि. १३)  केजुबाई बंधारा याच ठिकाणी   क्विन्स टाऊन येथील लहान  शिबिरार्थी पालकांसह या अभियानात सहभागी होणार आहेत. तसेच  नदी प्रदूषण समजून घेऊन त्याच्यावरील  उपाय योजना  याबाबत मार्गदर्शऩ केले जाणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button