breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
पत्रकार अर्नब गोस्वामी यांनी ‘मर्यादा’ पाळावी ; काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सुनावले!
मुंबई । प्रतिनिधी
पत्रकार अर्नब गोस्वामी यांनी एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसनेही गोस्वामी यांच्या विधानांचा निषेध केला आहे. तसेच, गोस्वामी यांनी ‘मर्यादा’ पाळावी, अशा भाषेत काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी सुनावले आहे.