breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये गाजली पंढरीची वारी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील सेवाव्रती संतोष गाताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून, पंढरपूरच्या वारीची माहिती दिली.  मन की बातच्या माध्यमातून भारतातील सर्व लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या या मोठ्या भक्तीधारेची माहिती मोदींनी पोहोचवावी अशी विनंती गाताडे यांनी केली होती. त्यानुसार 29 जुलैच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी वारीबाबत सविस्तर अशी माहिती दिली.

पंढरपूरची ही वारीची माहिती जगभर पुन्हा लोकांपर्यंत पोहोचली. मोदी यांनी या वारीत सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले.  कोल्हापूरच्या संतोष गाताडे यांनी कोल्हापूरची संवेदनशीलता या निमित्ताने दाखवून दिली. समस्त कोल्हापूरकर, वारकरी भक्त परंपरा या सर्वांच्या वतीने संतोष गाताडे यांचे अभिनंदन होत आहे.  गाताडे कोल्हापूर आणि परिसरात वैद्यकीय क्षेत्रांत सेवाभावी , निरलसपणे काम करतात. माधव नेत्रपेढीचे काम ते येथे करत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button