breaking-newsराष्ट्रिय

नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा उपस्थित केला आहे. नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला पाणी कोंडीचा इशारा दिला आहे. भारत सिंधू पाणी वाटप कराराचा अभ्यास करत आहे. पाकिस्तानच्या दिशेने वाहणारे पाणी भविष्यात राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या दिशेने वळवण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले.

पाकिस्तानला तीन नद्यांमधून पाणी जाते. शांतता आणि मैत्री संबंधांच्या आधारावर भारत-पाकिस्तामध्ये पाणी वाटप करार झाला होता. पण आता ही गोष्ट उरलेली नाही. त्यामुळे हा करार पाळणे आमच्यासाठी बंधनकारक नाही असे गडकरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानकडून दहशतवादाचे समर्थन सुरु आहे. पाकिस्तानने दहशतवाद्ला खतपणी घालणे थांबवले नाही तर पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे भारताने या पाणी वाटप कराराचा अभ्यास सुरु केला आहे. पाकिस्तानऐवजी हरयाणा, राजस्थान आणि पंजाबला हे पाणी मिळेल असे गडकरी म्हणाले. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा इशारा दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button