breaking-newsराष्ट्रिय
देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल- राज ठाकरे
रत्नागिरी : देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल, एक माणूस खोटं बोलून देशाला फसवतो हे आता लोक खपवून घेणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा देत मोदी सरकार आणि भाजपा हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करतंय. तर, विरोधक हा दिवस ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहेत. भाजपाच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याचं चित्र कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळालं होतं. या भाजपाविरोधी एकीचा पहिला गिअर आपणच गुढीपाडव्याच्या सभेत टाकला होता, असं राज यांनी काल म्हटलं होतं.