देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीय – माजी गृहमंत्री सुशीलकूमार शिंदे
पंढरपूर |महाईन्यूज|
देशात सध्या जे काही सुरू आहे. त्यावरून देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे, अशी सणसणीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी पंढरपूरात येऊन ज्येष्ठ नेते सुधाकर पंत परिचारक, भागवताचार्य वा.ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचं सांत्वण केलं.
मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था घसरत आहे. सामाजिक शांतता नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत, असे आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केले. या सगळ्या घटनांमुळेच देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालल्याची टीका शिंदे यांनी केली. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे.