दिल्लीत धुळीचे वादळ धडकले ; संपूर्ण उत्तर भारतात हाय अलर्ट
नवी दिल्ली : पंजाब, दिल्ली, हरयाणा, राजस्थानसह उत्तर भारताला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. वादळासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. वादळाच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.
धुळीच्या वादळाचा धोका असल्याने दिल्लीत आज मंगळवारी भरणाऱ्या सर्व शाळा बंद ठेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांत सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर भारतात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पंजाब, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरााम, त्रिपूरा, बिहार, मध्य प्रदेशमधील पश्चिमेकडचा भाग, उत्तर प्रदेशमधील पूर्वेकडील भाग, पूर्व राजस्थान, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू आणि केरळ याा राज्यांमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.