दिल्लीतील अराजकतेसाठी जो बायडनचा राजीनामा मागणार का ? राऊतांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
नवी दिल्ली – दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकतेसाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे,शरद पवार की जो बायडनचा?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या.कोणाचा राजीनामा मागणार?सोनीया गांधी. ममता बॅनर्जी. ऊध्दव ठाकरे.शरद पवार की ज्यो बाईडनचा? इस बात पर त्यागपत्र…राजीनामा तो बनता है साहेब..
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) January 26, 2021
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दिल्लीतील स्थिती बिघडली. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर देखील इतर ध्वज फडकवले. यावरून संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
क्या सरकार इसी दिनका बेसब्रीसे इंतजार कर रही थी?
सरकारने आखीरतक लाखो किसानों की बात नही सुनी.
ये किस टाईप का लोकतंत्र हमारे देशमे पनप रहा है?
ये लोकतंत्र नही भाई..
कुछ और ही चल रहा है.
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) January 26, 2021
सरकार याच दिवसाची वाट पाहत होते का? सरकारने लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे इतके दिवस ऐकून घेतले नाही. ही कशाप्रकारची लोकशाही आपल्या देशात जन्म घेत आहे?, ही लोकशाही नाही तर काहीतरी वेगळंच चालले आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
अगर सरकार चाहती तो आजकी हिंसा रोक सकती थी. दिल्लीमे जो चल रहा है ऊसका समर्थन कोई नही कर सकता. कोई भी हो लाल किल्ला और तिरंगेका अपमान सहेन नही करेंगे. लेकीन माहोल क्युं बिगड गया?सरकार किसान विरोधी कानून रद्द क्युं नही कर रही?क्या कोई अदृश्य हात राजनीति कर रहा है?
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) January 26, 2021
संजय राऊत म्हणाले की, सरकारने ठरवले असते तर दिल्लीतील आजचा हिंसाचार टाळता आला असता. तिथे जे चाललं आहे त्याचं कुणीच समर्थन करू शकत नाही. काहीही झालं तरी लाल किल्ला आणि तिरंग्याचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही. मात्र, त्याचवेळी स्थिती का बिघडली? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करायला तयार नाही. यात कोणती तरी अदृश्य शक्ती राजकारण करत आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.