दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी
- जम्मू काश्मीरमध्ये योग्य विचारांच्या लोकांबरोबर चर्चेची तयारी
- राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
श्रीनगर – जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानमधील सर्व योग्य विचाराच्या लोकांबरोबर चर्चेसाठी केंद्र सरकारची तयारी आहे. मात्र पाकिस्तानने आपल्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवल्या पाहिजेत, असे असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
चर्चा सर्वांबरोबर होऊ शकते. केवळ समविचारी असणे गरजेचे नाही. तर योग्य विचारांचे असणे अनिवार्य आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्र सरकार सर्व संबंधित लोक आणि गटांबरोबर चर्चेसाठी तयार आहे. त्याचसाठी सर्व संबंधितांबरोबर चर्चेसाठी समन्वयक नियुक्त केले आहेत. विशेष प्रतिनिधी आतापर्यंत 11 वेळा जम्मू काश्मीरमध्ये आले आहेत, हे काही पर्यटनासाठी नियुक्त केलेले नाहीत, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्यावतीने दिनेश्वर शर्मा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये चर्चेसाठीचे विशेष समन्वयक म्हणून नियुक्त केले अहे. त्यासंदर्भाने राजनाथ सिंह बोलत होते.