दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन जवान शहीद, दोन घुसखोरांचा खात्मा
श्रीनगर – दहशतवाद्यांच्या कारवाई थांबण्याचं नाव घेत नाहीय. जम्मू-काश्मीरचा भाग अद्यापही शांत झालेला नसून दहशतवादी आणि जवान यांच्यात सतत चकमकी घडत आहेत. त्यातच, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये एलओसीजवळ दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान, एक कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत. तर, दोन घुसखोरांचा खात्मा करण्यात आलाय.
शनिवारी रात्री माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर संशयीत हालचाली आढळून आल्या होत्या. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला व घटनास्थळावरून एक एके-47 रायफल आणि दोन बॅग हस्तगत करण्यात आल्या होत्या.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमधील कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे शहीद झाले. जवानांकडून परिसरात अद्यापही शोधमोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.