त्यांच्या लेखी नरेंद्र मोदी, अमित शहा हीच माणसे, बाकी सारी जनावरेच – राहूल गांधी
बंगळुरू – भाजपाच्या लेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा हीच दोन माणसे आहेत व बाकी सर्व जनावरे आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. भाजपावाल्यांना स्वपक्षीयांविषयी बोलण्याची हिंमत नाही, म्हणून ते विरोधकांवर असा राग काढतात, असा टोला त्यांनी लगावला.
स्थापना दिनानिमित्त मुंबईतील मेळाव्यात अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘साप’, ‘मुंगूस’ ‘कुत्रे’ आणि ‘मांजर’ असे संबोधून कधीही एकत्र न येणारे हे सर्व प्राणी मोदींच्या विरोधात एकत्र येण्याची भाषा करत आहेत, असे म्हटले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत, राहुल गांधी म्हणाले की, शहा यांच्या या भाषेवरून भाजपा आणि रा. स्व. संघाचा दृष्टीकोन काय आहे, हेच स्पष्ट होते. त्यांचे हे वक्तव्य अनादरकारक असले, तरी शहा यांचे हे वक्तव्य कोणीच गांभीर्याने घेत नाही.