…तुम्ही कोण मला महाराष्ट्रात येण्यापासून रोखणारे : कंगना राणावत
मुंबई । प्रतिनिधी
मुंबईची पाकव्यापत काश्मीरशी तुलना केलेली अभिनेत्री कंगना राणावतवर जोरदार टीका केली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगनामध्ये वाकयुद्ध रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे. संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईला परतू नये असे म्हटले होते. यावर कंगनाने देखील मुंबई कोणाच्या बापाची नाही असे म्हणत प्रत्युतर दिले होते. आता कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून, एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे, असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधत कंगनाने ट्विट केले की, एका महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कर्तृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? तुम्ही महाराष्ट्रावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता, हे कोणी ठरवले? आता मला तिथे येण्याचा अधिकारही नाही?”, असा तिने विचारला आहे. सोबतच #ShameOnMahaGovt चा देखील वापर तिने केला.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर टीकेची झोड उठत असून, राजकीय नेत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकार देखील कंगनावर निशाणा साधत आहेत.