..तर सर्वांचे आरक्षण रद्द करा; उदयनराजेंच्या भूमिकेने महाराष्ट्रात उडाली खळबळ
मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तसेच मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
अशातच आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील मराठा आरक्षण मुद्याबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. ‘आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा,’ अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजे यांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
तसेच आज शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात ३ ऑक्टोबरला होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण मेटे यांनी यावेळी दिले.
याचबरोबर या यावेळी येथे दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर तब्बल तासभर चर्चाही केली आहे. यावेळी उदयनराजे म्हणाले, ‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले तरी त्यांना अॅडमिशन मिळत नाही. या उलट कमी गुण मिळालेल्यांना अॅडमिशन मिळत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ‘प्रत्येक विद्यार्थ्याला बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि मेरिटवर निवड करा, हे मी अनेकदा सांगितलं आहे, असे उदयनराजे भोसले यांनी बोलताना म्हणाले.