..तर राज्यात अराजकता निर्माण होईल : दरेकर
मुंबई | महाईन्यूज
हिंगणघाट जळीत कांडातील पीडितेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दु:खद आणि मनसुन्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेन खाली गेली आहे. आम्ही पीडितेच्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा घटना रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
जर हे सरकार महिलांच्या विरोधात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यास सक्षम नसेल तर राज्यात अराजकता निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलेली आहे.आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून होताना दिसत आहे. पनवेल, मीरारोड, जळगाव, सिल्लोड याठिकाणी झालेल्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या घटनेनंतर जनता रस्त्यावर उतरली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले आहे.