breaking-newsमहाराष्ट्र

जालन्यात तीन मुलींचा बुडून मृत्यू

जालना – पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावात आज घडली. या घटनेमुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.

सोमित्रा सातपुते (वय 12 वर्षे), संगीता रणमळे (वय 15 वर्षे) आणि जना रणमळे (वय 18 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावातील 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, कपडे धुवून झाल्यानंतर या सहाही मुली पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र यातील एक मुलगी बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघींनी तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने जायला सुरुवात केली. पण तलावात पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने तिला वाचवताना तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, काठावर आलेल्या मुलींची आरडा-ओरड ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने गावकऱ्यांच्या हाती अपयश आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button