जरा काश्मीरकडेही बघा – मायावती
- मायावतींची मोदी सरकारला सूचना
लखनौ – काश्मीरात पत्रकार आणि सुरक्षा जवानांच्या हत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर बहुूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारने आपला अडेलतट्टुपणा सोडून काश्मीर धोरणाचा आढावा घेतला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली आहे.
भाजपचे काश्मीर धोरण हे लोककल्याणाऐवजी संकुचित स्वरूपाचेच आहे. त्यांनी आता गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालण्याची वेळ आहे असे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. राज्यातही भाजपचेच सरकार असताना जम्मू आणि काश्मीरातील स्थिती हाताबाहेर गेली आहे. सीमेवरही लोक मारले जात असून काश्मीर खोऱ्यातही लोकांच्या हत्या होत आहेत.
या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या काश्मीर धोरणात मोठा बदल होण्याची गरज आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरातील लोकांनी पाकिस्तान सरकार जशी वागणूक देत आहे तशी वागणूक जम्मू काश्मीर मधील लोकांना भारत सरकारकडून मिळताकामा नये असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.