breaking-newsराष्ट्रिय

जम्मू विमानतळाला राजा हरि सिंह यांचे नाव द्यावे – डॉ. करण सिंह

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमधील जम्मू विमानतळाचे नाव बदलून त्याला राजा हरि सिंह विमानतळ नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. करण सिंह यांनी ही मागणी केली आहे.

डॉ. करण सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले असून त्यात त्यांनी जम्मू विमानतळाला जम्मू-काश्‍मीरचे राजे महाराज हरि सिंह यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. जम्मू-काश्‍मीर हे मुस्लिमबहुल राज्य असूनही महाराजा हरि सिंह तेथील राजे होते.

1947 साली देशाची फाळणी झाल्यानंतर जम्मू-काश्‍मीरने भारतात सामील व्हावे अशी सूचना पंडित नेहरूंनी महाराजा हरि सिंह यांना केली होती. पण महाराज हरि सिंह यांनी ती मानली नाही. त्यांना जम्मू-काश्‍मीरचे स्वतंत्र राष्ट्र व्हायला हवे होते. मात्र पाकिस्तानी लष्कराने काश्‍मीरवर हल्ला करताच महाराजा हरि सिंह यांनी पंडित नेहरूंकडे मदत मागितली. पंडित नेहरूंनी त्यांना भारतात सामील होण्यास सांगितले.

महाराज हरि सिंह यांना ते मानवले. भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला पिटाळून लावल्यानंतत हरि सिंह यांनी भारतात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आणि आवश्‍यक दस्तावेजांवर सह्या केल्या. आणि जम्मू-काश्‍मीर भारतात विलीन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button