breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

चीन सोडणाऱ्या कंपन्यांना भारताकडे वळवा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपला चीनमधील गाशा गुंडाळणे सुरू केले आहे. हे लक्षात घेऊन देशातील विविध राज्य सरकारांनी आपल्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी अशा कंपन्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या चर्चेदरम्यान दिला.

भारतात चांगले मनुष्यबळ असून विकसित पायाभूत सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे लक्षात घेता पर्यायी ठिकाण म्हणून राज्यांकडे चीनमधील कंपन्यांकडे आपल्याकडे वळवण्याची क्षमता आहे, असे मोदी बैठकीत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button