चांद्रयान-2 उद्या अंतराळात झेपावणार
- श्रीहरिकोट्यातून होणार प्रक्षेपण
नवी दिल्ली – भारताच्या मिशन चांद्रयान-2 मोहिेम अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. अवघ्या काही तासानंतर ही मोहीम अंताराळात झेप घेईल. सोमवारी म्हणजे 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून GSLV मार्क-3च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेप घेणार आहे.
चंद्राच्या दक्षिण भागावर आजपर्यंत कोणत्याही देशाचे यान उतरलेले नाही. त्यामुळे भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल 800 कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत. लॉन्चिंग नंतर 52 दिवसाने चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचणार आहे. जवळपास 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण भागाच्या ध्रुवावर भारताचे हे यान उतरणार आहे.
सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 ला भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV मार्क-३च्या मदतीने लॉन्च केले जाईल. लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करेल. यानंतरचांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल. दरम्यान चांद्रयानाचा वेग अधिकाधिक 10 किलोमीटर प्रति सेकंद आणि कमीत कमी ताशी 3 किलोमीटर असणार आहे.