breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला टाळलं, पण शरद पवारांवर सोडले टीकास्त्र
पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘हिमालयात जावं’ या शिवसेनेच्या सल्ल्यावर खुद्द चंद्रकांत पाटलांनी उत्तर देणं शिताफीनं टाळलं आहे. पण चंद्रकांत पाटील हे विनोदी विधाने करतात, या शरद पवारांच्या टीकेला आणि त्यांच्या वाचळवीरांनी बडबड बंद करावी, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चतुराईनं पलटवार केला आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होतं. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोनल करत आहेत. मात्र, केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द होणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ठणकावून सांगितलेलं आहे. केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केलेला आहे.