breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या विकास कामांचा ‘धडाका’

  • अपुरा पाणी पुरवठा सहन करणा-या नागरिकांची झाली मुक्तता
  • अधिकारी, कर्मचा-यांना समोर घेऊन केली जलवाहिनी दुरूस्त

पिंपरी / महाईन्यूज

रहाटणी येथील कॉलनीतील रहिवाशांना व सोसायट्यांमधील सदनिकाधारकांना गेल्या दीड वर्षांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला. नागरिकांची तक्रार पाहताच नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी स्वतः लक्ष घालून गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली पाईपलाईन खोदकाम करून दुरूस्त करून दिली. त्यामुळे रहाटणीच्या अंतर्गत भागातील कॉलन्या व सोसायट्यांना होणारा पाणी पुरवठा नव्याने सुरळीत झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यक्षत्रामध्ये रहाटणी येथील रायगड कॉलनीच्या समोरील रस्त्यावर पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीला तांत्रिक त्रुटी निघाल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून उर्वरीत भागाला पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी नगरसेवक तसेच ग क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पाठपुरावा केला. तरी देखील त्यांना दाद न मिळाल्यामुळे प्रशासनाकडून होणारा अन्याय नागरिकांना निमुटपणे सहन केला. शेवटी ही तक्रार कानावर पडताड ग क्षेत्रीय प्रभागाचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी तातडीने प्रशासनाला फैलावर घेतले. माझ्यासमोर कामाला सुरूवात झाली पाहिजे. आजच्या आज काम पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा मिळालाच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अधिका-यांना सुनावले.

त्यावर बुधवारी (दि. 27) सकाळीच त्रिभुवन यांनी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. समोर उभे राहून रायगड कॉलनीसमोर खोदकाम करून जलवाहिनीची दुरूस्ती केली. सकाळी सुरू केलेले काम सायंकाळी उशीरा संपुष्टात आले. तोपर्यंत अध्यक्ष त्रिभुवन यांनी एका कर्मचा-याला तेथून हलू दिले नाही. भविष्यात पुढील भागाला पाणी पुरवठ्याची समस्या भेडसावणार नाही, याची दक्षता घेऊन त्रिभुवन यांनी पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे.

नागरिकांनी व्यक्त केले समाधान

रायगड कॉलनी, सुयोग कॉलनी, गुरूकूल कॉलनी, आर्यवेतांत सोसायटी, गोविंद धाम सोसायटी, साई कॉलनी 1-2-3 आदी लगतच्या भागातील सोसायट्या व कॉलनी परिसरातील नागरिकांना पुरवठा होणा-या जलवाहिनीतील तृटी कायमची दूर करण्यात आली. त्यामुळे या नारिकांचा पाणी पुरवठा आता सुरूळीत झाला आहे. गेल्या आठ दिवसांत पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनची कामे आणि रस्त्याची कामे झपाट्याने सुरू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा मिटल्यामुळे नागरिकांनी अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांचे आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button