breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘गाव कारभाऱ्यांनो ग्रामविकासासाठी एकत्र या’, अजित पवारांनी घातली साद

मुंबई – गाव कारभाऱ्यांनो आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं. निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या सर्वांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा :-ग्राम पंचायत निवणुकीत भाजपचा विस्तार झाला – देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे”.

पुढे ते म्हणाले की, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button