कोलार धरणात मोटरकार बुडून 6 युवकांचा मृत्यू
भोपाळ (मध्य प्रदेश) – भोपाळाजवळील कोलार धरणात मोटर कार बुडाल्यामुळे 6 युवक बुडून मरण पावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे सहाही युवक भोपाळमधीलच आहेत. सहाही जणांचे मृतदेह पोलीसांनी धरणातून बाहेर काढले असून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. आकाश साहू, पंकज साहू, रंजीत साहू, अभिजीत राठोड, गौरव साहू आणि रजनी पटेल अशी त्या सहाची नावे आहेत.
आपला मित्र आकाश याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व मित्र कोलार धरणाकडे आले होते. मात्र त्यांची मोटरकार धरणात कशी बुडाली हे समजू शकलेले नाही. आकाश साहू, पंकज साहू, रंजीत साहू, आणि रजनी पटेल हे चौघेजण भोपाळचे राहणारे आहेत, तर आभिजीत राठोड मुळचा कटारा हिल्स येथील आणि गौरव साहू रायसेनचा आहे.
धरणाजवळ उभ्या असलेल्या काही लोकांनी कार धरणात बुडताना पाहिली आणि ताबडतोब बिलकिसगंज पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती कळवली व त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.