breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनाच्या गाईड लाईन्स 31 मार्चपर्यंत वाढविण्याचे सर्व राज्यांना केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना विषाणूबाबतच्या गाईडलाईन्स येत्या 31 मार्चपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पत्रात लिहिले की कोरोना विरोधातील लढ्याला पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणे आणि नजर ठेवणे गरजेचे आहे.

तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातही महाराष्ट्र आणि केरळात जास्त रुग्ण आहेत. ते पाहाता उत्तर प्रदेश सरकार आता पूर्णपणे अलर्टवर आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि केरळातून जो कोणी प्रवासी विमानाने उत्तर प्रदेशात येईल त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी विमानतळावर अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने काल शुक्रवारी हे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र आणि केरळात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारची चिंता वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button