breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“कोरोना बरा होतो, त्याची भीती बाळगून कुणालाही दुय्यम स्थान देऊन माणूसकीचा गळा आवळू नका, नाती तोडू नका” – राजेश टोपे

कोरोनाच्या भीतीमुळे नात्यांवर परिणाम होत आहे. कोरोनामुळे अनेकांचे नातेही दुरावल्यासारखे झाले आहे. मात्र कोरोनामुळे आपली नाती तोडू नका, आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. नात्यातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नका, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

‘लोक भीतीपोटी खूप चुका करतात. पनवेलमधील घटनेचे उदाहरण देईल, ज्यामध्ये आई असिम्प्टोमॅटीक होती, ती बरी झाली. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटले आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. हा आजार बरा होतो मात्र हा आजार झालेल्यांशी वाळीत टाकल्याप्रमाणे वागू नका. एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या कोणत्या आजाराने मृत्यू झाला तरी कोरोनाच्या भितीमुळे माणूसकीचा बळी घेऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करण्याइतपही आवशक्यता वाटू नये हे कितपत योग्य आहे ‘, असेही ते म्हणाले.

राज्यात आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांमध्ये किमान ५००० रुग्ण असे आहेत ज्यांचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ९० वर्षे वयापुढील जवळजवळ ६०० लोक बरे झाले आहेत. करोनाबाधित रुग्ण १०-१२ दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. संसर्गाचे प्रमाण जास्त हा करोना विषाणूचा मुख्य गुणधर्म आहे. परंतु याची जागतिक टक्केवारी पाहिली तर ८० टक्क्यांपर्यंत लोकं असिम्प्टेमॅटीक आहेत. कोरोनाची तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी १० दिवस करोना काळजी केंद्रात राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. उर्वरित १५ टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावे वाटत नाही. उर्वरित काही २-३ टक्के रुग्ण गंभीर असतात, अशी माहिती त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button