‘कोणीही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही’, ब्राह्मण महासंघ
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळणे जवळपास दुरापास्त आहे, असे मत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) लाभ देण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत ब्राह्मण महासंघाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले
मराठा समाजाला आरक्षण मिळणे जवळपास दुरापास्त आहे. राजकीय संघटना, मराठा संघटनांचे नेते आणि अभ्यासकांना याची पुरेपूर जाणीव आहे. मात्र, कोणीही तसे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत करत नाही, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे.
कोणताही कायदा, आयोग, समिती किंवा अध्यादेश मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. उलट मराठा आरक्षण लागू होऊ शकत नाही असे अनेक नियम आणि कायदे आजही लागू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
ईडब्ल्यूएस आरक्षण योग्य असल्याचे म्हणत, मराठा समाजाला आरक्षणाच्या निकषांत बसवायचेच असेल तर ते फक्त आर्थिक आरक्षणाद्वारे शक्य होईल, असे दवे म्हणाले.