breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्राने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये – काशिनाथ नखाते

पुणे ते दिल्ली किसान ज्योत यात्रेचे स्वागत

पिंपरी | प्रतिनिधी

दिल्ली येथे अनेक दिवसांपासून देशातील शेतकरी तीव्र आंदोलन करत आहेत. अनेक बैठका झाल्या. केवळ निष्फळ चर्चाच केंद्र  सरकार करत  आहे. यावर तोडगा निघत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ही कृषी कायदे रद्द करा अन्यथा आम्ही रद्द करू, असा इशारा दिला आहे. आता केंद्राने अंत पाहू नये, अन्यथा देशात उद्रेक होऊ शकतो असे प्रतिपादन कष्टकरी नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

तीन कृषी कायद्याच्या विरोधात किसान ज्योत काढण्यात येत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्ली २६ जानेवरीच्या दिल्ली किसान प्रजासत्ताक मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी हि यात्रा काढण्यात आली. फुलेवाडा पुणे येथून युवराज गटकळ, प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शनात यात्रेचा प्रारंभ झाला. पिंपरी चिंचवड शहरात निगडी येथे कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने तरुणांच्या या उत्साहाला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देवून यात्रेचे स्वागत केले.

या वेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, प्रहारचे  शहरअध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, संदीप जाधव, हौसराव शिंदे, मधुकर वाघ, माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, सुनंदा चिखले, राजेश माने, उमेश डोर्ले, काशीम तांबोळी, प्रकाश साळवे, नितीन भराते,  अंबालाल सुकवांल सुरज देशमाने ओम प्रकाश मोरया, संजय साळुंखे ,संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.

नखाते म्हणाले की, केंद्रीय कामगार व इतर  संघटना आणि स्वतंत्र  संयुक्त मंच यांच्याकडून हे राक्षसी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. अजूनही कायद्यात रुपांतर न झालेले वीज विधेयक रद्द करणे, सर्व पिकांना किमान आधारभूत भावाची कायदेशीर हमी देऊन त्यांच्या शासकीय खरेदीची यंत्रणा उभी करणे यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. या बाबतीत केंद्र सरकार दाखवत असलेल्या सरासर नकारात्मक आणि अहंकारी वृत्तीचा धिक्कार शेतकरी बांधव करत आहे. अखिल भारतीय किसान संघटनांच्या संयुक्त मंचाने आता हा लढा अधिकच तीव्र करण्याचा आणि तो देशभरात नेण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने तळागाळातील कार्यक्रमांची एक साखळी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये २३ ते २५ जानेवारी २०२१ ला राज्यांच्या राजधानीत तीन दिवसीय महापडाव, आणि २६ जानेवारी २०२१ रोजी अधिकृत शासकीय परेड संपल्यावर समांतर गणतंत्र दिवस परेड या कार्यक्रमांचा समावेश आहे.

या वेळी पुणे ते लोणावळा पर्यंत महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button