breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कृषी कायदा मागे घ्या, अन्यथा ‘खेल रत्न’ परत करणार ‘या’ खेळाडूचा सरकारला इशारा!

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरुद्ध सुरु असलेले आंदोलन सलग 11 व्या दिवशी सुरु आहे. या आंदोलनाला आता पुरस्कार वापसीचंही स्वरुप आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्याच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वीच पद्मविभूषण पुरस्कार सरकारला परत दिला.

आता या प्रकरणात बॉक्सर विजेंदर सिंहने देखील उडी घेतलेली आहे. सरकारने विधेयक मागे घेतले नाही तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार परत देण्याचा इशारा विजेंदरने दिला आहे. विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर मागील लोकसभा निवडणूक देखील लढवलेली होती.

आवश्य वाचा: चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला टाळलं, पण शरद पवारांवर सोडले टीकास्त्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button