breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना जीवंत पकडण्याचा सुरक्षा दलाचा नारा

श्रीनगर:  गेल्या सात महिन्यात ७० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलाने आता दहशतवाद्यांविरोधात नवा नारा दिला आहे. ‘दहशतवाद्यांना जीवंत पकडा आणि त्यांची समस्या जाणून घ्या’, असा नाराच सुरक्षा दलाने दिला आहे. दहशतवादी संघटनांच्या गळाला लागलेल्या तरुण मुलांना या मार्गातून परावृत्त करण्यासाठी सुरक्षा दलाने हा नारा दिला आहे.

दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने सामील होणाऱ्या तरुणांचा ब्रेनवॉश करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे दहशतवाद्यांचे नेटवर्क उदध्वस्त होण्यास मदतच होणार असल्याचेही अधिकारी म्हणाला.  १५ ते १६ वर्षाची मुलं सुद्धा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात. या कारवाया करताना मृत्यू येऊ शकतो याचे त्यांना भान नसते. त्यामुळे त्यांचा ब्रेशवॉश करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांना जीवंत पकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या अनेक तरुणांना त्यातून बाहेर पडायचं असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. काही अतिरेक्यांनी तर आमच्याशी संपर्कही साधला आहे. त्यांना शिकायचे असून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button