काळ कसोटीचा आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा विचार करु नये : अनिल बोंडे
राजस्थान आणि मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीक कर्जमाफीपेक्षा महाराष्ट्रात पीक कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या काही आठवड्यांत उर्वरीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात सध्या कृषी संकट निर्माण झाले आहे ही खरी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १९,००० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरीत शेतकऱ्यांना येत्या काही आठवड्यांमध्ये कर्जमाफीचा फायदा मिळेल असे आश्वासन त्यांनी यावेळी देले.
दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वचनाची पुर्तता सरकार करणार असून आजपर्यंत ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनाचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांना खात्री देतो की सरकार त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा विचार करु नये.