breaking-newsराष्ट्रिय
कांदा, टोमॅटो शेतकऱ्यांना गेल्या तीन महिन्यांत मोठा फटका
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील सर्वांत मोठी असलेल्या इंदौर येथील मंडईत फेब्रुवारी ते मेदरम्यान कांद्याचे भाव जवळपास ७९ टक्क्यांनी गडगडले आहेत. तर, याच कालावधीत टोमॅटोचे भाव जवळपास ५० टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील शेतकऱ्यांना संप पुकारण्यास भाग पडले आहे.
या संपाचा प्रभाव पाहिला असता, जरी हा संप काही भागात सुरुवातीच्या टप्प्यात कमजोर वाटत असला, तरी तो दुसऱ्या आठवड्यात मात्र तितक्याच तीव्रतेने बहुतांश ठिकाणी सुरू झाला आहे.
महाराष्ट्रात मात्र, या आठवड्यात घाऊक बाजारात शेतमालाचा पुरवठा सामान्य राहिला. इतर भागात देखील अशीच परिस्थिती दिसून आली. दरम्यान, आता महाराष्ट्रात हा संप अधिक तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता असून त्याचा आणखी फटका बसण्याची चिन्हे आहेत.