breaking-newsमहाराष्ट्र

काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, ही तर निव्वळ अफवा – शरद पवार

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याचा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीची आज मुंबई बैठक झाली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितील राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राष्ट्रवादीची ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार, उमेदवार, पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याच्या अफवा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील, असे शरद पवार यांनी सांगितले.

आजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाही. तुम्ही ४० लोक आहात, तुमचा ४० लोकांचा एक संच आहे. तुम्ही खंबीरपणे लढा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत शरद पवार म्हणाले, ‘एक वेळ अशी होती की, आपल्यासोबतचे ५८ लोक साथ सोडून गेले होते. सभागृहात आम्ही फक्त ६ जण होतो. मात्र आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणले. त्यात सर्व नवे चेहरे होते.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button