breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

काँग्रेसची मागणी…भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ द्या!

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम ।

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी केलीय.

पंजाबमधील मोहालीस्थित विमानतळाचं ‘शहीद-ए-आजम भगतसिंग विमानतळ’ असं नामकरण करावं, अशी मागणीही तिवारींनी केली. तसेच, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही अधिकृतरित्या ‘शहीद-ए-आजम’ म्हणून घोषित करावं.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या मागणीला महत्त्व आलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button