काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल – संजय निरुपम
महा ई न्यूज | मुंबई :
‘मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मुंबईतले फक्त एक तिकीट मागितले होते, पण तेही दिले गेले नाही. त्यामुळे मी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांनी घेतला आहे.
काँग्रेसने पुन्हा नव्या जोमाने झेप घ्यावी, ही माझी भावना आहे आणि त्यासाठी यापुढेही काम करण्याची इच्छा आहे. परंतु, मला ज्या पद्धतीची वागणूक दिली जात आहे, ती तशीच मिळत राहिली तर फार काळ थांबणे शक्य नाही, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.
देशातील, राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. ती पक्षश्रेष्ठींना समजून घ्यावी लागेल. चापलुसी न करणाऱ्या नेत्यांना, बंद खोली राजकारण न करणाऱ्या नेत्यांना संधी द्यावी लागेल, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. जे सुरू आहे ते अजून तरी सहन करू शकतोय. ज्या दिवशी सहनशक्तीचा अंत होईल, तेव्हा पुढचा निर्णय घेईन, असेही त्यांनी सूचित केले.