breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कमी पाण्यामुळे महाराष्ट्रातील उन्हाळी पीक लागवडीला फटका

मुंबई : यावर्षी कमी पाणी पाणी उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील उन्हाळी लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. लागवडीची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहते. पण, राज्याच्या बऱ्याचशा भागात पाण्याची कमतरता असल्याने जवळपास ५१ टक्के भागावरील उन्हाळी तांदूळ आणि उन्हाळी मक्याची लागवड घटली आहे.

सरासरी १.६८ लाख हेक्टरवरील लागवडीची तुलना करता, सुमारे ७९ टक्के क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. तर २० टक्के क्षेत्र पाण्याच्या कमतरतेमुळे लागवडीविनाच राहिले.

कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी प्रमाणात झालेल्या लागवडीमुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४० टक्के ते ५० टक्के घट होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष मोसमी पावसाकडे लागून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button