औरंगाबाद, कल्याणसह महाराष्ट्रातील सात स्थानकांवर मिळणार ‘नवरात्री स्पेशल थाळी’
शक्तीरूपातील देवीचे पूजन आणि सृजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. या दिवसांमध्ये देवीची उपासना करण्यासाठी अनेक जण नऊ दिवस न चुकता उपवास करतात. अनेक जण या दिवसांमध्ये उपवासाचे पदार्थ किंवा एखादं फळ खाऊन उपवास करतात. त्यामुळेच अशाच उपवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करुन भारतीय रेल्वे प्रशासनाने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही ठराविक स्थानकांवर उपवासाच्या सात्विक फराळाची सोय केली आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे लांब पल्लाचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वेमध्ये ‘व्रत का खाना’ मिळणार आहे. हा फराळ इ- केटरिंग सर्विसअंतर्गंत प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. २९ ते ७ सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे. याविषयी IRCTC ने ट्विट करत ही माहिती दिली.
२९ ते ७ सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, अकोला, वसई रोड, कल्याण, बोरीवली, नागपूर, अहमदनगर,दौंड या स्थानकांसह कानपूर सेंट्रल, जबलपुर, रतलाम, जयपुर, बीना, पाटणा, राजेंद्र नगर, हजरत निजामुद्दीन, अंबाला कैंट, झांशी, इटारसी, वापी, दुर्ग, लियर, मथुरा, भोपाळ, उज्जैन या स्थानकांवर हे पदार्थ मिळणार आहेत.