breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबादमध्ये ‘लॉकडाऊनमुळे’ पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला

जिल्हाबंदी हटल्यानंतरही कोरोना संसर्गाच्या साथीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे देशातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. पर्यटनावर निर्बंध असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे सुमारे शंभर कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाले आहे. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबांनाना जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे.

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते. या भागात पर्यटनावर अवलंबून असंख्य कुटुंब अवलंबून आहेत. खुलताबाद तालुक्यातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाण असलेले म्हैसमाळ, पावसाळी धबधबे ही पर्यटकांची मोठी आकर्षणाची केंद्रे आहेत. खुलताबाद येथील विश्रामगृहातील खाद्यपदार्थ याकरिता प्रसिद्ध आहे, मात्र करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे बंद असल्याने आर्थिक उलाढाल कोलमडली आहे.

आठ जुलैपासून ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर ‘अनलॉक’ जाहीर करून काही निर्बंध हटविले. हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे हॉटेल बंद असताना महावितरणने भरमसाठ वीज बिले दिल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. सर्व हॉटेल पूर्णपणे बंद आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते. ती पूर्णपणे थांबली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button