breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादमध्ये करोनाचा प्रसार दिवसागणिक वेगानं; तर, आतापर्यंत करोनाने घेतले 354 बळी

महाराष्ट्रात मुंबई, पुणे नंतर औरंगाबाद जिल्ह्यात करोनाचा प्रसार दिवसागणिक वेगानं होत आहे… रोज जास्त संख्येनं रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत करोनाने ३५४ बळी घेतले आहेत. आज एका दिवसात ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी म्हणजे आज सकाळी ११३ नवे बाधित आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८५७७ झाली आहे, तर आतापर्यंत ३५४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५०६१ बाधित हे करोनामुक्त झाले असून, सध्या ३१६२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नऊ व्यक्तींची शहराच्या एंट्री पॉइंटवर केलेली अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागातही 11 जण कोरोना बाधित सापडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button